Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे. Show all posts
Showing posts with label प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे. Show all posts

Sunday, December 17, 2017

प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध भाषणे डाउनलोड करण्यासाठी खालील pdf वर क्लिक करा.
Click Here
भारतीय प्रजासत्ताक दिन
भारताचे संविधान
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकातदरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिनआहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिवसऑगस्ट १५ व गांधी जयंतीऑक्टोबर २). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्लीयेथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.
नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
इतिहास
४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी भारताच्या घटनाकारांच्या मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला, व त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस या मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली, व त्यानंतर तो २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला..
उत्सव
दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.
रिपब्लिक डे मराठी संदेश व कार्ड्‌स
उत्सव तीन रंगाचा अभादी आज सजला [१]
प्रमुख अतिथी
सन १९५० पासून भारत प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसर्‍या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.
वर्ष
प्रमुख अतिथी
देश
१९५०
राष्ट्रपती सुकर्णो[२]
१९५१
१९५२
१९५३
१९५४
१९५५
गव्हर्नर जनरल मलिक घुलाम मुहम्मद [२]
१९५६
१९५७
१९५८
१९५९
१९६०
१९६१
१९६२
१९६३
१९६४
१९६५
१९६६
१९६७
१९६८
राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो[६]
१९६९
१९७०
१९७१
१९७२
१९७३
१९७४
राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो
१९७५
राष्ट्रपती केनेथ काँडा[१२]
१९७६
पंतप्रधान जाक शिराक[२]
१९७७
प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक[१३]
१९७८
राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि[१४]
१९७९
पंतप्रधान माल्कम फ्रेझर[१५]
१९८०
१९८१
१९८२
१९८३
राष्ट्रपती शेहु शगारी[१८]
१९८४
१९८५
१९८६
१९८७
राष्ट्रपती ॲलन गार्शिया[२२]
१९८८
१९८९
जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह[२४]
१९९०
१९९१
१९९२
राष्ट्रपती मारिओ सोआरेस[२५]
१९९३
पंतप्रधान जॉन मेजर[२]
१९९४
पंतप्रधान कोह चोक थोंग[२]
१९९५
राष्ट्रपती नेल्सन मंडेला[२६]
१९९६
१९९७
पंतप्रधान बसदेव पांडे[२५]
१९९८
राष्ट्रपती जॅक शिराक[२]
१९९९
२०००
२००१
२००२
राष्ट्रपती कस्साम उतीम[२५]
२००३
राष्ट्रपती मोहम्मद खातामी[२]
२००४
२००५
२००६
२००७
राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन[२]
२००८
राष्ट्रपती निकोला सार्कोझी[२]
२००९
२०१०
राष्ट्रपती ली म्युंग बाक[२५]
२०११
२०१२
पंतप्रधान यिंगलक शिनावत[२८]
२०१५
राष्ट्रपती बराक ओबामा[२९]
२०१६
राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांद
२०१७
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन
लेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ जानेवारी २०१३
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन - (Republic Day India) देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय प्रजासत्ताक दिन मराठी शुभेच्छापत्रे
जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारीइ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने उत्साहाने साजरे करतो. त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतो. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा ‘प्रजासत्ताक दिन’ आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो २६ जानेवारीला.
हा दिवस शाळा कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे. मान्यवर व्यक्ती निवृत्त अधिकारी नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजपासून कवायती. भाषणे विविध कार्यक्रम केले जातात. लहान मुले हातात झेंडे घेऊन नाचतात. राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावला जातो.
१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाश तुटले… आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल. लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी सुपुत्र ह्यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्य घटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे.
दरवर्षी २६ जानेवारीला लालकिल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते. हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो.
हिंदी भाषण डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023-24 इयत्ता तिसरी ते आठवीसाठी चे सर्व विषयांचे गुणांचे संकलन तक्ते एक्सएल स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Do...